पेडगावचा किल्ला हा बहादूरगड म्हणून प्रसिद्ध आहे . बहादूरगड किल्ला अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यामध्ये पेडगाव येथे आहे . अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात श्रीगोंदा तालुका आहे व या तालुक्याच्या दक्षिण सीमेवरून भीमा नदी वाहते त्या लगतच भीमा नदीच्या उत्तरतीरावर बहादूरगड किल्ला आहे.
छायाचित्र
किल्याची रचना :-
पेडगावचा बहादुरगड हा भीमेच्या काठावर आहे . याची दक्षिणेकडील तटबंदी भीमानदिला समांतर आशी आहे. साधारण आयताकृती आकाराच्या बहादूरगडाची निर्मिती मोगल सरदार बहादूरखान कोकालताश याने केली . किल्याला तीन चार प्रवेशद्वारे आहेत . मुख्य प्रवेशमार्ग गावाच्या बाजूला आहे . किल्यामध्ये असलेल्या अनेक वास्तू आज उध्वस्त झालेल्या आहेत . याची तटबंदी मात्र उभी असून सर्वत्र काटेरी रान माजलेले आहे . नदीच्या बाजूच्या तटबंदिमध्ये असलेले बांधकाम पाहण्यासारखे आहे . या दुमजली इमारतीच्या खिडक्यामधून भीमानदीचा देखावा सदर दिसतो . किल्ल्यामध्ये सबब नक्षीकाम असलेले दोन मंदिर आहेत . या मंदिरापैकी लक्ष्मीनारायण मंदिर त्यातल्या त्यात बऱ्या अवस्थेमध्ये आहे . या मंदिरामधील अलंकुत स्थंब तसेच बाहेरील मूर्ती पाहण्याजोग्या आहे .
किल्ल्याचा इतिहास
निजामशहाच्या काळात पेडगाव एक महत्वाचे केंद्र होते. आजही तेथील किल्यात निजामशाहिच्या खुणा दाखविणारा चादबीबी महाल आहे. येथूनच बावन्न परगन्यांचा कारभार चालत असल्याच्या काही नोंदी सापडतात .
बहादूरखानाने हा किल्ला बांधला. या बहादुरखानाला शिवाजीराजानी चांगलाच धडा शिकवला तोही दोनदा. हा बहादूरखान औरंगजेबाचा दुधभाऊ आहे. त्याला औरंगजेबाने सुभेदार म्हणून दक्षिणेत पाठवले . त्याला बहादूरखान कोकलताश अशी पदवी दिलेली होती. याने भीमेच्या काठावर किल्ला बांधला आणि त्याला आपलेच नाव देण्याची बहादुरी केली. हा ' स्थलदुर्ग ' आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात या किल्ल्याला फारच महत्व आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक नुकताच पार पडला होता. त्यासाठी अमाप खर्चही झाला होता. तो खर्च भरून काढायला बहादुरखानाणे आपण होऊन शिवाजीराज्याना संधी दिली. बहादुरखानाने बहादुरगडमध्ये एक कोटीचा शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरवी घोडे औरंगजेबाकडे पाठविण्यासाठी गोळा केले होते . महाराजांच्या हेरांनी सगळा तपशील गोळा करून आणला होता .
महाराजांनी आपल्या सरदाराबरोबर नऊ हजारांचे सैन्य बहादूरगडावर खजिना आणण्यासाठी पाठवले . या सरदाराने आपल्या सैन्यात दोन भाग केले. एक दोन हजाराचा तर दुसरा सात हजाराचा. दोन हजाराच्या तुकडीने बहादूरगडावर जोरदार हल्ला केला. या तुकडीचा उद्देश गडबड उडवून देण्याचा होता तो सफल झाला. बहादूरखान लढाईसाठी तयारी करून मराठ्याच्या सैन्यावर चढून गेला. त्यावेळी मराठ्याच्या तुकडीने माघार घेऊन पलायला सुरवात केली .त्यामुळे बहादूरखानला चेव चढला. त्याने मराठ्याच्या गाठण्यासाठी त्यांचा जोरदार पाठलाग सुरु केला . मराठ्यानी बहादूरखानला हुलकावणी देत देत खूप लांबवर आणून सोडले . दरम्यान मराठ्याच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादूरगडावर हल्ला चढवला. गडामध्ये तुरळक सैन्य , नोकरचाकर आणि बाजार बुनगेच उरले होते. मराठ्यानी खजिना आणि घोडे ताब्यात घेऊन रायगडाकडे कुच केली.
बहादूर खान पाठलागावरून परत आला. तेव्हा त्याला मराठ्यानी शाही खजिना लुटल्याची बातमी कळाली. तेव्हा त्याला मराठ्याच्या बहादुरीची खरी जाणीव झाली. खजिना घालवून आणि कशीबशी आपली अब्रू वाचवून या पेडगावच्या शहाण्याला गप्प बसावे लागले .
कसे जाल
पेडगावच्या बहादूर गडाला जाण्यासाठी दोनतीन मार्ग आहेत .
१. दौड हे पुणे जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव असून रेल्वे आणि गाडी रस्त्याने जोडले आहे. दौडकडून गाडी रस्त्याने देऊळगाव पर्यंत येऊन पेडगाव गाठावे लागते, अलीकडील पेडगाव मधून नावेने पलीकडील पेडगाव मधील बहादूरगडाला जावे लागते
२. दुसरा मार्ग म्हणजे अहमदनगर कडून अथवा पुण्यातून श्रीगोंदा येथे पोहचावे व तेथून पेडगावला यावे . हा सोयीचा मार्ग आहे .
मागे जाण्यासाठी येथे क्लिक करा ..
बहादूरखानाने हा किल्ला बांधला. या बहादुरखानाला शिवाजीराजानी चांगलाच धडा शिकवला तोही दोनदा. हा बहादूरखान औरंगजेबाचा दुधभाऊ आहे. त्याला औरंगजेबाने सुभेदार म्हणून दक्षिणेत पाठवले . त्याला बहादूरखान कोकलताश अशी पदवी दिलेली होती. याने भीमेच्या काठावर किल्ला बांधला आणि त्याला आपलेच नाव देण्याची बहादुरी केली. हा ' स्थलदुर्ग ' आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात या किल्ल्याला फारच महत्व आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक नुकताच पार पडला होता. त्यासाठी अमाप खर्चही झाला होता. तो खर्च भरून काढायला बहादुरखानाणे आपण होऊन शिवाजीराज्याना संधी दिली. बहादुरखानाने बहादुरगडमध्ये एक कोटीचा शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरवी घोडे औरंगजेबाकडे पाठविण्यासाठी गोळा केले होते . महाराजांच्या हेरांनी सगळा तपशील गोळा करून आणला होता .
महाराजांनी आपल्या सरदाराबरोबर नऊ हजारांचे सैन्य बहादूरगडावर खजिना आणण्यासाठी पाठवले . या सरदाराने आपल्या सैन्यात दोन भाग केले. एक दोन हजाराचा तर दुसरा सात हजाराचा. दोन हजाराच्या तुकडीने बहादूरगडावर जोरदार हल्ला केला. या तुकडीचा उद्देश गडबड उडवून देण्याचा होता तो सफल झाला. बहादूरखान लढाईसाठी तयारी करून मराठ्याच्या सैन्यावर चढून गेला. त्यावेळी मराठ्याच्या तुकडीने माघार घेऊन पलायला सुरवात केली .त्यामुळे बहादूरखानला चेव चढला. त्याने मराठ्याच्या गाठण्यासाठी त्यांचा जोरदार पाठलाग सुरु केला . मराठ्यानी बहादूरखानला हुलकावणी देत देत खूप लांबवर आणून सोडले . दरम्यान मराठ्याच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादूरगडावर हल्ला चढवला. गडामध्ये तुरळक सैन्य , नोकरचाकर आणि बाजार बुनगेच उरले होते. मराठ्यानी खजिना आणि घोडे ताब्यात घेऊन रायगडाकडे कुच केली.
बहादूर खान पाठलागावरून परत आला. तेव्हा त्याला मराठ्यानी शाही खजिना लुटल्याची बातमी कळाली. तेव्हा त्याला मराठ्याच्या बहादुरीची खरी जाणीव झाली. खजिना घालवून आणि कशीबशी आपली अब्रू वाचवून या पेडगावच्या शहाण्याला गप्प बसावे लागले .
कसे जाल
पेडगावच्या बहादूर गडाला जाण्यासाठी दोनतीन मार्ग आहेत .
१. दौड हे पुणे जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव असून रेल्वे आणि गाडी रस्त्याने जोडले आहे. दौडकडून गाडी रस्त्याने देऊळगाव पर्यंत येऊन पेडगाव गाठावे लागते, अलीकडील पेडगाव मधून नावेने पलीकडील पेडगाव मधील बहादूरगडाला जावे लागते
२. दुसरा मार्ग म्हणजे अहमदनगर कडून अथवा पुण्यातून श्रीगोंदा येथे पोहचावे व तेथून पेडगावला यावे . हा सोयीचा मार्ग आहे .
छायाचित्रे
समाप्त
मागे जाण्यासाठी येथे क्लिक करा ..